अलीकडेच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे, ज्यामध्ये Jio सर्वात मोठा बोलीदार होता. 5G सेवा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच airtel ने सांगितले की, ते ऑगस्टच्या अखेरीस त्यांची 5G सेवा सुरू करतील. दरम्यान, INS ने आपल्या अहवालात दावा केला आहे की, रिलायन्स जिओ 15 ऑगस्ट रोजी आपली 5G सेवा लाँच करण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, "देशव्यापी फायबरची उपस्थिती, पायाभूत सुविधांसह सर्व-IP नेटवर्क, स्वदेशी 5G स्टॅक आणि तंत्रज्ञान इकोसिस्टममधील मजबूत जागतिक भागीदारीमुळे जिओ कमीत कमी वेळेत 5G रोलआउटसाठी सज्ज आहे." जिओने सांगितले की, त्यांचे 5G नेटवर्क नेक्स्ट जनरेशनचे डिजिटल सोल्यूशन्स सक्षम करेल, जे 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारताच्या AI-संचालित मार्चच्या वाटचालीला गती देईल.
JIO इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी काय म्हणाले ?
या आठवड्याच्या सुरुवातीला, रिलायन्स JIO इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, ते संपूर्ण भारतातील 5G रोलआउटसह 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करतील." Jio जागतिक दर्जाची, परवडणारी 5G आणि 5G-सक्षम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये भारताची डिजिटल क्रांती घडवून आणणारी सेवा, प्लॅटफॉर्म आणि उपाय आम्ही प्रदान करू."
त्यानंतर ते म्हणाले की, "जिओच्या 4G रोलआउटचा वेग, स्केल आणि सामाजिक प्रभाव जगात कुठेही अतुलनीय आहे. आता, मोठ्या महत्त्वाकांक्षा आणि दृढ संकल्पासह, Jio भारताच्या 5G युगात वाटचाल करण्यासाठी सज्ज आहे."
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile