या महिन्याच्या अखेरीस 5G सेवा लाँच झाल्यामुळे बरेच काही बदलण्याची अपेक्षा आहे. यामध्ये स्मार्ट ऍम्ब्युलन्स ते चांगला डेटा स्पीड, विना अडथड्याने व्हिडिओ बघणे अशा सुविधा उपलब्ध असतील. तसेच, क्लाउड गेमिंग आणि शॉपिंग दरम्यान ग्राहकांना बरेच नवीन अनुभव मिळू शकतात. हे एक चौरस किलोमीटरमध्ये एक लाख संचार उपकरणांना समर्थन देईल. हाय कॉलिटी मोठे व्हिडिओ किंवा चित्रपट काही सेकंदात डाउनलोड केले जाऊ शकतात.
ग्राहकांना सध्या 10-15 शहरांमध्येच 5G ची सेवा मिळणार असली, तरी येत्या 12-18 महिन्यांत ती देशभरात ऍक्टिव्ह केली जाऊ शकते. 5G सेवा शिक्षण देण्याच्या पद्धतीत देखील बदल करू शकते. दुर्गम भागातही, शिक्षकांना संचालित होलोग्रामद्वारे जोडून आणि वर्गखोल्यांमध्ये सामग्री प्रसारित करून शिक्षण दिले जाऊ शकते.
या वर्षाच्या सुरुवातीला Airtel ने अपोलो हॉस्पिटल्स आणि सिस्कोसोबत 5G कनेक्टेड ऍम्ब्युलन्स दाखवली. याच्या मदतीने रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाच्या टेलीमेट्री डेटाची माहिती रिअल टाइममध्ये मिळू शकते. यात अल्ट्रा हाय स्पीड 5G नेटवर्कशी जोडलेल्या पॅरामेडिक स्टाफसाठी ऑनबोर्ड कॅमेरा देखील जोडला जाऊ शकतो.
अपघात टाळण्यासाठी सहायक ठरेल
5G चा वापर रस्ते अपघात रोखण्यासाठी डेटा शेअर करून मदत करू शकतो. ड्रोन डिलिव्हरीमुळे याचा खूप फायदा होईल. मात्र, 5G सेवा 4G पेक्षा 20 टक्के महाग असण्याची शक्यता आहे. भारतातील मोबाईल डेटाच्या किमती जगाच्या तुलनेत खूपच कमी आहेत. अशा परिस्थितीत कंपन्यांना दर वाढवण्याची संधी आहे.
मानवी चुका कमी होतील
5G चा वापर उत्पादन आणि उत्पादकता सुधारण्यासोबत मानवी चुका कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. एरिक्सनच्या अहवालानुसार, 2027 च्या अखेरीस भारतातील 5G ग्राहकांची संख्या 500 दशलक्ष असू शकते. यामुळे आपल्या जगण्याच्या, कामाच्या इ. मध्ये मूलभूतपणे बदल होईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile